" सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही " - देवेंद्र फडणवीस || Marathi news


          राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येविषयी वक्तव्य केले होते. जास्त लोकसंख्या असणाऱ्या वसाहतींमध्ये करोनाचा प्रसार जास्त होतो. त्यामुळेच मुंबई आणि दिल्लीतील रुग्ण संख्या अधिक आहे. महाराष्ट्रातील सरकारला आमचा पाठिंबा आहेच , परंतु मोठे निर्णय घेण्याइतके अधिकार काँग्रेसला नाही. तर आमच्याकडे छत्तीसगढ ,पंजाब व राजस्थानमध्ये निर्णय घेण्याची क्षमता आहे. शक्य तितकी मदत महाराष्ट्र सरकारला केंद्राकडून मिळायला हवी .आम्ही सरकारला सूचित करू शकतो. त्यावर अंमल बजावणी करायची की नाही हे केंद्र सरकार ठरवेल ” असं राहुल गांधी म्हणाले.


          माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राजकीय परिस्थितीवर आणि राज्यातील करोना पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडली. करोनामुळे राज्यात निर्माण झालेल्या परिस्थिती विषयी चिंता व्यक्त करतानाच हे सरकार पाडण्यात भाजपाला जराही रस नाही, अशी भूमिका देवेंद्र फडणवीस यांनी मांडली.

" सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही " - देवेंद्र फडणवीस || Marathi news
" सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही " - देवेंद्र फडणवीस || Marathi news

          पत्रकार परिषदेत देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र सरकारकडून मिळालेल्या मदतीची यादी वाचून दाखवली. त्यावर ते म्हणाले, “केंद्र सरकारनं महाराष्ट्राला तीन महिन्यांच्या काळात २८ हजार १०४ कोटी रुपये दिले आहेत. पंतप्रधान गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून अन्नदान्य देण्याचा निर्णय केंद्रानं घेतला. त्यानंतर तीन महिन्यांच्या काळात केंद्रानं महाराष्ट्राला गहू, तांदूळ, डाळ आणि स्थलांतरित मजुरांच्या खर्चापोटी ४,५९२ कोटी रुपये दिले. औषधी, पीपीई किट्स, एन९५ मास्क याच्या खर्चासाठी ४६८ कोटी रुपये मदत दिली आहे", असं फडणवीस यांनी सांगितलं.


          राहुल गांधी यांनी केलेल्या एका वक्तव्यावरून देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेसवर टीका केली . म्हणाले “राहुल गांधी यांनी केलेले विधान अतिशय गंभीर आहे. स्वतःच्या जबाबदारीपासून पळणारे हे विधान आहे. त्यांच्या विधानावरून काँग्रेस पक्ष आपली जबाबदारी झटकून संपूर्ण दोष मुख्यमंत्र्यांवर आणि शिवसेनेवर ढकलण्याचा प्रयत्न करीत आहे. राज्य सरकारमध्ये ताळमेळ नाही. या काळात खर्च कशावर झाला, हे पाहिले तर सरकारची प्राथमिकता काय हे दिसून येईल. सध्या लढाई करोनाविरुद्ध आहे. सरकार पाडण्यात आम्हाला रस नाही. सध्या करोनाच्या लढाईतून लक्ष विचलित करण्यासाठी, माध्यमांचं लक्ष इतरत्र वळवण्यासाठी अशा बातम्या दिल्या जात आहेत ” असं आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाराष्ट्रावर कोरोनाचे असे संकट असताना असे राजकीय राजकारण पाहायला मिळत आहे त्यामुळे जनतेतून संताप व्यक्त होत आहे . 


➤ Subscribe करा आमच्या YouTube Channel ला -  Click here Khasmarathi

➤ Whatsapp Updates साठी 9284678927 * या क्रमांकावर तुमचे व तुमच्या जिल्ह्याचे नाव व्हॉटसअप करा.


हे तुम्ही वाचायला हवं : 

१)  असे शूज ज्यांची किंमत ऐकून डोळे चक्रावतील... !! 


२)  ".... अन त्याने खाल्ले रस्त्यावर मृत पडलेल्या जनावराचे मांस ", व्हायरल व्हिडीओ


        ही माहिती कृपया आपल्या ओळखीतील प्रत्येक व्यक्तीपर्यंत नक्की शेअर करा ! खासमराठी नेहमीच रोचक माहिती तुमच्यासाठी आणत असते.... धन्यवाद !!

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने